फॉलोअर

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

नात्यांमध्ये व्यवहार आला कि, नाती का तुटतात? - When Business it comes in relationships, why do relationships break up?

 नात्यांमध्ये व्यवहार आला कि , कितीही घट्ट नाती असली तरी ती कमकुवत होतात आणि शेवटी ती तुटतात .. हे असे का होत असेल याचा विचार करण्या ऐवजी एकमेकांना दोष देऊन लोक मोकळे होतात. नात्यांमध्ये व्यवहार करूच नये असे ठामपणे आपल्या समाजात सांगितले जाते. पण चुका समजून घेण्याचे आणि यातील दोष दूर करण्याचे प्रयत्न मात्र कोणी करताना दिसत नाही. लहानपणी शाळेत "एकीचे बळ " हि गोष्ट सांगितली जायची या छोट्याश्या गोष्टींमधून त्यांना एक बोध द्यायचा होता तो असा होता कि "एक काठी तोडणे सहज शक्य आहे , तेच जर ५ काठ्या एकत्र आल्या तर त्या तोडणे मात्र कठीण आहे. " त्यामुळे त्या गोष्टीतील आजोबा त्यांच्या ५ मुलांना हा बोध एका उदाहरणातून सांगतात. आणि मुलांना ते पटते देखील. हि गोष्ट आणि यातून दिला जाणारा बोध खूप मोठा आहे. कधी याचा विचार नसेल केला तर जरूर करा. 


आपण जेव्हा एखाद्या बाहेरील व्यक्तीबरोबर एखादा व्यवहार सुरु करतो तेव्हा त्या व्यवहाराची सुरवात एखाद्या कराराने होते आणि मग भागीदारीत व्यवसाय सुरु होतो. येथे भावनिक व्यवहार नसतो फक्त आर्थिक व्यवहार असतो. आणि या व्यवहारात नफा - तोट्याची सर्व गणिते स्पष्ट असतात. भागीदारीच्या संमतीने सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळे इथे गैरसमजाला अजिबात जागा नसते. सर्व व्यवहारांमध्ये स्पष्टता असते. आरोप - प्रत्यारोपांना काही अर्थ नसतो. जे काही आहे ते कागद बोलत असतात त्यामुळे या "व्यावहारिक मैत्री" मधील व्यवहार संपला तरी मैत्री मात्र टिकून राहते. नाती तुटत नाहीत. 

याउलट जेव्हा नात्यांमध्ये व्यवहार केला जातो तेव्हा करारापेक्षा मानपान आणि अहंकार याला जास्त महत्व दिले जाते. नात्यांमधील व्यवहार हा व्यावसायिक व्यवहार कमी पण भावनिक व्यवहार जास्त असतो. कागदपत्रापेक्षा इथे विश्वास आणि शब्द यांस जास्त महत्व असते. "भावना आणि व्यवहार" या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण समजून घेण्यात आजही कमी पडतो. 

जर बारकाईने विचार केलात तर कुटुंबातील किंवा नात्यातील लोकांसोबत व्यवहार किंवा व्यवसाय केला तर घरातील पैसे घरात राहणार आपल्या सोबत आपले लोक देखील प्रगती करतील. आपल्या सहकार्याने ते किंवा त्यांच्या सहकार्याने आपण असाध्य गोष्टी देखील साध्य करू शकतो. फक्त नात्यात जेव्हा आर्थिक व्यवहार येणार असतील तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्या जसे कि , 

मानपान आणि शब्दांपेक्षा पेक्षा करारास महत्व द्या. 

आप-आपल्या कौशल्याप्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे कामाची विभागणी करून घ्या.
 
व्यवहारात स्पष्टता ठेवा. विश्वासापेक्षा कागदपत्रांना महत्व द्या. कायम लक्षात ठेवा कि व्यवहार , भावना , नातेसंबंध या सर्व गोष्टी वेग-वेगळ्या आहेत. त्यांना वेगवेगळे च ठेवायला शिका. सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवहाराला "उपकार" म्हणून पाहू नका. व्यवहाराला व्यवहार म्हणूनच पहा आणि त्यात "नफा-तोटा" पहा.  नात्याला मध्ये आणून त्यात मानपान अहंकार पाहू नका.  

जर नात्यात कोणाला काही नवीन व्यवसाय करायचा आहे आणि आपण मदत करू शकत असाल तर तुम्ही जरूर ती करण्याचा प्रयत्न करा पण त्यात खरंच व्यावसायिक दृष्टिकोन आहे का हे देखील पहा. नसेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करा ( अर्थात त्यांची इच्छा असेल तर ) 

आपल्या कुटुंबातील आणि आपली सर्वांची प्रगती व्हावी हा चांगला हेतू आहे आपला त्यामुळे सर्वांच्या व्यावहारिक विचारांना कल्पनांना सामान महत्व द्या. तटस्थपणे मार्केट आणि नव्या कल्पनांचा सारासार विचार करून त्याप्रमाणे प्राधान्यक्रम मिळून ठरवा. यश-अपयशाची जबाबदारी कोण घेणार हे ठरवा . मगच आर्थिक व्यवहाराला सुरवात करा. 

थोडे काळजी पूर्वक आणि भावनेला बाजूला ठेऊन जर तुम्ही कोणासोबत हि आर्थिक व्यवहार केलेत तर कधीहि तुम्हाला पच्छाताप करायची वेळ येणार नाही तुमचे नातेसंबंध व्यवहारांमुळे खराब होणार नाहीत. उलट तुमचा आदर करणाऱ्यांची संख्या वाढेल तसेच तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायात भागीदार असल्याने तुमचा आर्थिक स्थर देखील वाढण्यास मदत होईल. नात्यांमध्ये व्यवहार आला तर त्याचा फायदाच होईल फक्त त्या व्यवहारांकडे व्यवहार म्हणूनच तटस्थ पणे पहा. 

तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा 

धन्यवाद 
हेमा यादव कदम 

 

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । - Shri Manache Shlok

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
मनावर नियंत्रण नसणारी व्यक्ती कधीही यश मिळवू शकत नाही , आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण असणे फार महत्वाचे असते. वरील श्लोक मध्ये समर्थ म्हणतात कि , भक्तिमार्गाचा स्वीकार करा मगच श्रीहरी भेटणार , म्हणजेच तुम्हाला हव्या असणाऱ्या चांगल्या गोष्टीचा ध्यास घ्या मग ती गोष्ट तुम्हाला सहज मिळेल , पुढे ते म्हणतात कि "ज्या गोष्टी समाजमान्य नाहीत त्या सोडून द्या आणि ज्या गोष्टी समाज मान्य आहेत त्या करा ... " या पहिल्याच श्लोक मध्ये त्यांनी आपल्याला आनंदाने कसे जगावे हे अगदी सहज सोप्या शब्दात सांगितले आहे पण आपण या कडे फक्त श्लोक म्हणून पाहतो आणि वाचतो. आपल्यातील किती लोक हे आचरणात आणतात ., "काळाबरोबर चालण्याचा सल्ला यात आपल्याला समर्थानी दिला आहे " आपल्यातील किती लोक काळाबरोबर चालतात., स्वतःच्या विचारांमध्ये बदल घडवून आणतात ., "खरं तर बदल म्हणजे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते ." निसर्गातही काळाप्रमाणे बदल घडून येत असतात ., मग आपण हि याच निसर्गाचा भाग असताना आपल्याला बुद्धी , मन , भाषा सर्व काही गोष्टीचे ज्ञान असताना आपण काळाबरोबर का चालत नाही , तुम्ही आम्ही मिळून च समाज बनलेला आहे मग तरीही आपण आपले समाजमान्य नसलेले विचार घट्ट पकडून ठेवतो., बदल स्वीकारत नाही आणि त्यामुळे नैराश्याचा भाग आपण बनतो .. समर्थानी खूप वर्षांपूर्वी आपल्याला सांगितले आहे कि , " जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ "" पण आपल्यातील किती लोक या प्रमाणे वागतात .. अजूनही आपली मने बदल स्वीकारायला तयार नाहीत .. आणि त्यामुळेच आपण नैराश्याचे जोडीदार बनत चाललो आहोत स्वतःचे विचार मांडायची आपल्याला भीती वाटते , "लोक काय म्हणतील ? " या विचाराने आपण आपल्याला करावेसे वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण करत नाही आणि त्यामुळे आयुष्यातील आनंद हरवत जातो .. आयुष्य खूप क्षणभंगुर असते .. त्याचा आनंद घ्या उद्याच्या विचारात आणि कालच्या दुःखात हरवून " आज " ला विसरू नका ..

All The Best
hema yadav kadam

अपयश हे विचारात असते. - "Failure Word is just a Word. Nothing More Than That. "




बऱ्याचदा आपल्या मनात असे विचार येतात कि, जसे आपले आयुष्य आपल्याला हवे होते ते आयुष्य हे नक्कीच नाही. मला अजून काहीतरी चांगले मिळायला हवे होते. मला अपेक्षा वेगळीच होती पण माझ्या सोबत जे घडते आहे ते मात्र काहीतरी वेगळेच आहे. आपल्या हवे होते तितके यश आपल्याला नाही मिळवता आले. असे विचार तुमच्या हि मनात येत असतील तर हा लेख जरूर वाचा आणि जर पटले तर मला कंमेंट मध्ये नक्की लिहा.  

आपल्या यशातील सर्वात मोठा अडथळा कोण असेल तर ते असते आपले मन .... आता हे माझे मत आहे.  कदाचित तुमचे मत माझ्यापेक्षा वेगळे हि असू शकेल! पण व्यक्त होण्याआधी मला काय म्हणायचे आहे ते तर पूर्ण वाचून तर घ्या. तुम्हाला माहित आहे का ? कि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक चांगली - वाईट गोष्ट हि आपल्या विचारांतून आपल्या समोर येऊन उभी राहत असते म्हणून सर्व संत तसेच धार्मिक ग्रंथांतून आपल्याला मन या विषयावर काम करायला सांगितले जाते. मोठं-मोठे मानसशात्रज्ञ  या विषयावर काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर देखील  हेच सांगतात कि मन हे छान असायला पाहिजे तरच आयुष्य छान होणार . सर्व यशस्वी लोक नेहमी सकारात्मक विचार करा. असेच सांगत असतात. कारण हे यश मिळवण्यासाठी त्यांनी मनावर ताबा मिळवलेला असतो. त्यांच्या मनाला आणि अंतर्मनाला ते नेहमी हेच सांगत असतात कि, मला सर्वांपेक्षा काही तरी वेगळे करायचे आहे मला यशस्वी व्हायचे आहे. आणि त्या प्रमाणे कोणत्याही परिस्थिती ते मनाला खचू देत नाही आणि सतत कार्यमग्न होऊन काम करत राहतात. " त्यांना माहित असते आज तूप खाऊन उद्या लगेच रूप येणार नाही " त्यामुळे ते थोड्या यशाने हुरळून जात नाहीत. आणि अपयशाने खचून हि जात नाही. त्यांचे यशाच्या दिशेने अविरत मार्गक्रमण सुरु असते. आणि एक वेळ अशी येते कि या खडतर मार्गावरून चालून त्यांना त्यांचे ध्येय मिळते, सर्व समाज आदराने त्यांचे कौतुक करू लागतो. 

या सर्व यशामागे फक्त ३ महत्वाच्या गोष्टी असतात.  त्या म्हणजे "सातत्य , निष्ठा आणि जिद्द" या ३ गोष्टी तुमच्याकडे असल्या कि तुम्हाला जगातली कोणतीही शक्ती तुमच्या ध्येयापासून दूर ठेऊ शकणार नाही. पण जर या ३ गोष्टीवर तुम्ही ठाम राहत नसाल , लोकांनी तुमच्या अपयशाबद्दल बोलण्याने तुमच्या विचारांवर त्याचा परिणाम होत असेल तुमच्या कार्यावर तुमची निष्ठा नसेल तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला अपयशी होण्यापासून वाचवू शकणार नाही. कारण तुमचे मन स्थिर नसणे म्हणजे तुम्ही अपयशी जीवनाकडे टाकलेले पहिले पाऊल असते. लक्षात घ्या कि "Failure Word is just a Word. Nothing More Than That. " बस हे इतकेच आहे. याहून अधिक काहीच नाही. या शब्दाचा बाऊ करू नका, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला आणि तुमच्या कल्पनांना वेड्यात काढायला खूप लोक असणारच आहेत. पण त्यांना किती महत्व द्यायचे हे पूर्ण पणे तुमच्या विचारांवर अवलंबून असते. तुमची तुमच्या कामावर पूर्ण निष्ठा असायला पाहिजे जे काम तुम्ही करत आहात ते करत असताना कोणताही इतर विचार न करता पूर्ण श्रद्धेने ते कार्य पूर्ण करायला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. घरात किंवा व्यावहारिक जगात वावरताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. 

कोणाच्या आणि कोणत्या बोलण्याला किती महत्व द्यायचे ? 
कोणतेही काम सुरु करण्याआधी त्याचा सर्व बाजूनी व्यवस्थित अभ्यास करायचा . 
कामावर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवायची . 
दिवसाची सुरवात सकारात्मक विचारांनी करायची. 
नकारात्मक विचाराच्या सर्व लोकांपासून दूर राहायचे . 
वाचन वाढवायचे कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती हि , सकारात्मक विचारांच्या साठ्यासाठी भरपूर वाचन करतात.  तुम्ही यशस्वी झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे चरित्र कथा वाचा तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील कि, सर्वसामान्य  ते  असामान्य  हा प्रवास त्यांनी सकारात्मक विचारांच्या जोरावर कसा पार केला. 

चिखलात राहून सुद्धा कमळासारखे खुलून जगण्यालाच खरे जगणे म्हणतात. तुमचे आयुष्य कसे असायाला हवे हे दुसरे तिसरे कोणी ठरवत नसून तुमचे विचार ठरवतात. आपल्यासारख्या च गर्दीत आपले स्वातंत्रसैनिक जन्माला आले पण जाताना समाजाला खूप काही  देऊन गेले. आज हि आपण त्या सर्व थोर महात्म्यांचे ऋणी आहोत. पण हे ऋण फक्त आभार मानून फिटणार नाहीत.  आपल्याला त्यांनी दिलेली शिकवण अमलात आणावी लागेल आपल्याला शिकावे लागेल कि यशस्वी आयुष्य कसे जगायचे आणि सकारात्मक सुंदर विचारांची बाग आपल्या अंतकरणात कशी फुलवायची... आता आपल्याला फक्त स्वतःसाठी स्वतःशी लढायचे आहे आणि स्वतःशीच जिंकायचे आहे ... विचारात परिवर्तन घडवा आयुष्य आपोआप यशाच्या दिशेने वाटचाल करू लागेल... सर्वाना खूप खूप शुभेच्छा .... माझ्या या विचारांवर तुमचे मत अवश्य कळवा . "©"

धन्यवाद
हेमा यादव कदम 

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

" भीती " समाजाची वाटते कि , " फसवणुकीची "

 

" भीती " समाजाची वाटते कि , " फसवणुकीची "

पन्नाशी ओलांडल्यानंतर एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांना एकटेपण जेव्हा त्रास देऊ लागते.  ना तेव्हा  त्यांना जोडीदाराची गरज भासू लागते . कारण मित्र-मैत्रीण परिवाराच्या हि काही मर्यादा असतात . आणि त्यामुळे हक्काचं कोणीतरी आपल्या आयुष्यात असायला पाहिजे असे वाटणे यात काहीच गैर नाही. 

पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या सततच्या येणाऱ्या बातम्यांमुळे ५० ते ६५ हा वयोगट कुठेतरी मानसिक गोधळात असलेला दिसून येतो. 

 यांच्या मनात येणारे काही प्रश्न : 

 प्रश्न १ : . या वयात  पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप चा निर्णय घेणे योग्य आहे का

उत्तर :  होय तुम्ही जर एकटे असाल तर हेच योग्य वय आहे हा निर्णय घेण्याचा.  कारण ७० वर्षानंतर जोडीदार मिळण्याची शक्यता थोडी कमी होते.  आणि खऱ्या अर्थाने तेव्हा कोणीतरी आपल्या व्यक्तीच्या मायेच्या स्पर्शाची आपल्याला गरज असते.  जर आता हा निर्णय नाही घेतला तर उशीर होईल ...... विचार करा 

 

प्रश्न २ : आमच्या संपत्तीचे काय होणार

उत्तर : तुमच्या संपत्तीचे काय करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो . तुम्ही तसे agreement  करू शकता. आणि जी व्यक्ती तुमचा आधार होणार आहे त्या व्यक्तीला काहीतरी देणे हि तुमची जबाबदारी असणार आहे . 

 प्रश्न ३ : आमची फसवणूक होईल का ? 

उत्तर : " फसवणूक तेव्हाच होऊ शकते, जेव्हा आपण स्वतःहून कोणाला फसवणुकीची संधी देतो. " 

 ज्येष्ठांमध्ये एका गोष्टींचा आभाव मला जाणवतो तो म्हणजे त्यांना स्वतःवर खूप विश्वास असतो. त्यांना असे वाटते कि, आम्ही आयुष्यात इथपर्यंत आलो आहोत.  आता आमचे निर्णय  आम्ही घेऊ शकतो.  आणि आता या वयात आमचे निर्णय चुकणे शक्यच नाही.  याच अति आत्मविश्वासामुळे गोष्टी शेअर करण्याचे प्रमाण कमी होते.  

आपण काय करतोय

कोणाला भेटत आहे ?  

हे घरातल्या लोकांना किंवा मित्रपरिवारात सांगण्याची त्यांना गरज वाटत नाही.  आणि इथेच फसवणुकीची मेढ रोवली जाते. 

फसवणूक होऊ नये या साठी घ्यावयाची काळजी : 

 १. तुम्ही लिव्ह इन किंवा पुनर्विवाह चा विचार करताय सर्वात आधी हे घरात सांगा . 

२. तुम्ही कोणाला डेट करत असाल तर त्यांच्या घरातील लोकांना भेटा.  

३. संस्था किंवा जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्या शिवाय आर्थिक व्यवहार करू नका . 

४. कोणत्याही गोष्टी लपवू नका .

५. निर्णय घेण्यापूर्वी काही काळ त्या व्यक्तीसोबत मित्र - मैत्रीण म्हणून रहा. पण फक्त एन्जॉयमेंट म्हणून नाही तर त्या व्यक्तीची "स्वभाव ओळख" करून घ्या . 

६. विवाहपूर्व / लिव्ह इन पूर्व ऍग्रीमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका . 

 

प्रश्न : स्वभाव जुळतील का ? माझ्यासारखेच कोणी असेल का ? 

उत्तर : वाढत्या वयाप्रमाणे जसे आपण आपला स्वभाव बदलू शकत नाही.  त्या प्रमाणे समोरील व्यक्ती सुद्धा या वयात स्वतःमध्ये फारसे बदल करू शकणार नाही. याची जाणीव मनात राहू द्या त्याच्या / तिच्या सवयी आपण या वयात सहन करू शकतो का ? याचा विचार करा. आयुष्यात जसा आपण संघर्ष केलाय तसाच तो समोरच्याने देखील केला आहे . आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे नुकसान झाले नाही.  त्यामुळे त्या व्यक्तीला चूक किंवा बरोबर म्हणण्याचा आता प्रश्नच नाही . आता फक्त आपण त्या व्यक्तीला "आहे  तसे स्वीकारू शकतो का ? " हा प्रश्न स्वतःला विचारा. 

 

प्रश्न : मला लिव्ह इन किंवा पुनर्विवाह नको मला फक्त मित्र - मैत्रीण पाहिजेत. मिळणार का ? 

उत्तर  :  हो नक्की मिळणार पण ते फक्त मित्र - मैत्रीणच राहणार हे लक्षात घ्या. तुमच्या घरातले एकटेपण या नात्याने दूर नाही होणार . कारण मैत्री आणि प्रेम किंवा विवाह या सर्व नात्यांमध्ये एक धूसर पुसट अशी रेषा असते जी या नात्यांमधील वेगळेपण वेळ आल्यावर दाखवून देते. हि नाती जरी एकसारखी वाटत असली तरी त्याच्या काही मर्यादा आहेत . "आपण ४० वर्षाच्या आतील लोकांना असे म्हणतो का ? कि मुलांनो लग्न नका करू मित्र - मैत्रीण म्हणून राहा . " हे आपण नाही सांगत कारण "जोडीदार" म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहित आहे . तसेच ५० - ६५ वयात जोडीदार नको फक्त मित्र - मैत्रीण पाहिजे हे म्हणणे तितकेच चुकीचे आहे . आताचा तात्पुरता विचार करून निर्णय नका घेऊ . मैत्री - प्रेम - विवाह यातील धूसर रेषा ओळखा. नात्यांच्या मर्यादा समजून घ्या . आणि हे योग्य वय हातातून जाऊ देऊ नका . कारण सत्तरी नंतर चे एकटेपण जास्त त्रासदायक असते . 

 

प्रश्न : लोक काय म्हणतील

उत्तर : लोक काही हि म्हणत नाहीत . सर्व आपल्या सुपीक मनाचे खेळ असतात. कोणाला हि इतका वेळ नाही कि तुमच्या मागे २४ तास फिरून तुमच्यावर चर्चा करत बसतील. आपण जे विचार करतो तेच विचार चित्र रूपाने कधीतरी आपल्या समोर येऊन उभे राहतात . त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करा. तुम्ही स्वतः म्हणालात ना कि मी चूक केली तरच लोकं त्याला चूक म्हणतात.  खूप उदाहरणे आहेत समाजात अशी कि , मोठं-मोठया चुका त्यांच्या समाजाने मान्य नसताना स्वीकारल्या आहेत. मग तुम्ही तर चूक करत नाही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केलात तर  लिव्ह इन आणि पुनर्विवाह हि तुमच्या जीवनाची गरज आहे आणि ती तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे . 

तुम्ही जेव्हा घरात एकटे आजारी असता मानसिक दृष्ट्या खचलेले असता ना तेव्हा लोकं फक्त "अरेरे .... " इतकेच म्हणतात या पेक्षा जास्त काही हि नाही. आणि ते तुमची मदत करायलाही येत नाहीत .. शहरांसारख्या ठिकाणी तर घरात ज्येष्ठांचा मृत्यू होतो आणि २-३ दिवस कोणाला कळत हि नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा कि , "अरेरे .... " म्हणणाऱ्या लोकांचं ऐकायचं कि , स्वतःच्या मनाचं आणि भविष्याचं ......... ? 

    लिव्ह इन आणि पुनर्विवाह साठी ऑफिस मध्ये चौकशी साठी येणाऱ्या लोकांकडून हे प्रश्न मला बऱ्याचदा विचारले जातात आणि त्यामुळे आज थोडे या वर लिहावे असे वाटले. सर्व ज्येष्ठाना मला फक्त इतकेच सांगायचे आहे कि , "वयाप्रमाणे फक्त शरीर थकते मन कधीही थकत नाही . मन कायम तरुण असते . जसे कि , देवानंद यांनी तर वयाच्या ९० वर्षानंतर हि सिनेमा काढला. " वय हा फक्त एक आकडा आहे " तर आयुष्याचे इतके अनुभव घेतल्यानंतर हि जर तुम्ही विनाकारण नको त्या प्रश्नांमध्ये अडकून स्वतःचे आयुष्य एकटे राहून वाया घालवत असाल तर वेळीच विचार करा . पटकन तुमच्यासाठी योग्य असेल तो निर्णय घ्या आणि विचारांच्या जाळ्यातून मोकळे व्हा . कोणावर अपेक्षा लादू नका आणि कोणाकडून अपेक्षा करू नका . जसे लहानपणी ( १० वर्षाच्या आधी ) वर्तमानात जगत होतात आता तसे कसलाही विचार न करता निरागस पणे वर्तमानात जगायला सुरवात करा . पहा आयुष्य किती आनंदी होऊन जाईल ते ..  

 

आपल्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि माझ्या या लेखातून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी अपेक्षा ... 

धन्यवाद 

हेमलता यादव-कदम